धाराशिव तालुका │ धाराशिव तालुक्यातील ताकविकी परिसरातील शेतकऱ्यांनी यंदाच्या अतिवृष्टीमुळे झालेले प्रचंड शेती नुकसान लक्षात घेऊन हेक्टरमागे 50 हजार रुपये मदतीची मागणी केली आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी ग्रामसभेत ठराव घेऊन शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याची विनंती सरपंच व ग्रामसेवकांकडे केली आहे.
मे महिन्यापासून ताकविकी परिसरात संततधार पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाला. शेतकऱ्यांनी मोठ्या खर्चाने औषधोपचार, खते, बियाणे यावर खर्च केला; तरीही सततच्या पावसामुळे पिके उभे राहिले नाहीत. परिणामी शेतकऱ्यांच्या हाती काहीही न लागण्याची वेळ आली आहे.
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, “आम्ही कर्ज काढून शेती केली, परंतु अतिवृष्टीमुळे सर्व पिके हातची गेली. त्यामुळे शासनाने तात्काळ मदत जाहीर करून प्रत्यक्ष मदत पोहोचवावी. अन्यथा शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागेल.”
या मागणीसाठी ग्रामस्थांनी सरपंच आणि ग्रामसेवक यांच्याकडे लेखी निवेदन दिले आहे. यात शासनाकडे ठराव पाठवावा अशी विनंती करण्यात आली आहे.
या निवेदनावर जेष्ठ नागरिक नागनाथ सिंगठाकूर, बलुसिंग अरणकर, सुखसिंग बायस, महादेव यादव, प्रतापसिंग राजपूत, श्रीधर तरंगे, कोंडीबा तरंगे, सोपान यादव, जनता सिंग ठाकूर, श्रीदेवी ठाकूर, दिलीपसिंग ठाकूर, छानू ढेपे, गुलाब शेख, गणूसिंग बायस, वैभव बायस, संभाजी सूर्यवंशी, विमल सूर्यवंशी, बालाजी बायस, मारुती जाधव, रोहित सूर्यवंशी, सोहेल तांबोळी, महेश बीटलकर, हनुमंतसिंग सुरतबन्सी, फारुक शेख, नारायण यादव, लिंबराज यादव, शैलेश प्रकाशसिंग ठाकूर, सुलोचना ठाकूर, नसरुद्दीन वाडकर, गिरीधरसिंह बायस, मारुती यादव, शंकर देवकर, शिवचरण ठाकूर, धरमसिंग ठाकूर आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
ग्रामस्थांच्या या ठरावाकडे शासनाने सकारात्मक दृष्टीने पाहून तात्काळ मदत जाहीर करावी, अशी मागणी केली जात आहे.
- धाराशिव जिल्ह्यात भाजप शिवसेनेपेक्षा केवळ 3 टक्क्यांनी पुढे
- परंडा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी चुरशीचे मतदान;७३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद!
- ईटचा ‘रणसंग्राम’ शांत; उमेदवारांचे राजकीय भवितव्य ‘पेटी’बंद!
- तेर मध्ये आम आदमी फोडतोय प्रस्थापितांना घाम!
- मेघराज पाटील यांचा तालुका प्रमुख पदाचा राजीनामा उबाठा शिवसेनेला जय महाराष्ट्र
