धाराशिव तालुका │ धाराशिव तालुक्यातील ताकविकी परिसरातील शेतकऱ्यांनी यंदाच्या अतिवृष्टीमुळे झालेले प्रचंड शेती नुकसान लक्षात घेऊन हेक्टरमागे 50 हजार रुपये मदतीची मागणी केली आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी ग्रामसभेत ठराव घेऊन शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याची विनंती सरपंच व ग्रामसेवकांकडे केली आहे.
मे महिन्यापासून ताकविकी परिसरात संततधार पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाला. शेतकऱ्यांनी मोठ्या खर्चाने औषधोपचार, खते, बियाणे यावर खर्च केला; तरीही सततच्या पावसामुळे पिके उभे राहिले नाहीत. परिणामी शेतकऱ्यांच्या हाती काहीही न लागण्याची वेळ आली आहे.
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, “आम्ही कर्ज काढून शेती केली, परंतु अतिवृष्टीमुळे सर्व पिके हातची गेली. त्यामुळे शासनाने तात्काळ मदत जाहीर करून प्रत्यक्ष मदत पोहोचवावी. अन्यथा शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागेल.”
या मागणीसाठी ग्रामस्थांनी सरपंच आणि ग्रामसेवक यांच्याकडे लेखी निवेदन दिले आहे. यात शासनाकडे ठराव पाठवावा अशी विनंती करण्यात आली आहे.
या निवेदनावर जेष्ठ नागरिक नागनाथ सिंगठाकूर, बलुसिंग अरणकर, सुखसिंग बायस, महादेव यादव, प्रतापसिंग राजपूत, श्रीधर तरंगे, कोंडीबा तरंगे, सोपान यादव, जनता सिंग ठाकूर, श्रीदेवी ठाकूर, दिलीपसिंग ठाकूर, छानू ढेपे, गुलाब शेख, गणूसिंग बायस, वैभव बायस, संभाजी सूर्यवंशी, विमल सूर्यवंशी, बालाजी बायस, मारुती जाधव, रोहित सूर्यवंशी, सोहेल तांबोळी, महेश बीटलकर, हनुमंतसिंग सुरतबन्सी, फारुक शेख, नारायण यादव, लिंबराज यादव, शैलेश प्रकाशसिंग ठाकूर, सुलोचना ठाकूर, नसरुद्दीन वाडकर, गिरीधरसिंह बायस, मारुती यादव, शंकर देवकर, शिवचरण ठाकूर, धरमसिंग ठाकूर आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
ग्रामस्थांच्या या ठरावाकडे शासनाने सकारात्मक दृष्टीने पाहून तात्काळ मदत जाहीर करावी, अशी मागणी केली जात आहे.
- धाराशिव-सोलापूर रेल्वे प्रकल्पाचा खर्च 900 कोटींवरून 3000 कोटींवर दिशा समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांची माहिती
- मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात वाढ, पायाभूत प्रकल्पांना गती
- धाराशिव जिल्ह्यात मराठा आंदोलन तीव्र: सकल मराठा समाजाची लवकरच जिल्हा बंदची हाक, मुंबईला जाणारा दूध-भाजीपाला बंद करण्याचा इशारा
- येडशी बसस्थानक वगळून जाणाऱ्या एसटी बसला चाप: ज्येष्ठ नागरिकाच्या तक्रारीनंतर चालक-वाहकावर कारवाई
- मराठा समाजाच्या कल्याणासाठी फडणवीस-शिंदेंचे सर्वाधिक योगदान : नरेंद्र पाटील