वाशी( राहुल शेळके): कळंब तालुक्यातील पिंपळगाव (को)येथे दि.8 जून रोजी सायंकाळी आठ वाजता अचानक मुसळधार पाऊस चालू झाला. मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट सुरू होता. पिंपळगाव (को) येथील कल्याण अंबादास चौधरी यांचे मेन रोडवर कुंदन किराणा स्टोअर्स छोटेसे दुकान आहे. पाऊस सुरू झाला म्हणून चौधरी यांनी दुकानाला कुलूप लावून आपल्या घरी गेले. तोच सायंकाळी 8:32 मिनिटांनी विजांचा कडकडाट झाला. एक वीज किराणा दुकानाला धडकून दरवाज्यातून आत गेली. त्यामुळे तेथे मोठा आगीचा लोळ निर्माण झाला. किराणा दुकानात विक्रीसाठी ठेवलेले सर्व साहित्य तसेच चौधरी यांच्या मुलाचे गेल्या सहा महिन्यापूर्वी लग्न झाल्यामुळे त्यांच्या लग्नात आलेले सर्व संसार उपयोगी साहित्य, कपाट ,दिवाण ,गादी, भांडे सर्व या आगीत भस्म झाले. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.ही घटना झाल्याबरोबर गावचे सरपंच ज्ञानेश्वर सुंदर तांबडे आणि आजूबाजूच्या गावकऱ्यांनी तेथे जाऊन आग वीजवण्याचा प्रयत्न केला. परंतु तो प्रयत्न फसला. या झालेल्या घटनेमुळे चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून प्रशासनाने त्यांना लवकरात लवकर पंचनामा करून मदत द्यावी अशी मागणी होत आहे.
- धाराशिवकरांना 18 महिने वाट पहायला लावून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री करणार उद्घाटन
- जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांवर ‘महिलाराज’, मात्र राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत बोटावर मोजता येतील इतक्या महिला!
- कुस्तीच्या आखाड्यातला मल्ल आता राजकारणाच्या मैदानात शड्डू ठोकणार!
- धाराशिव नगरपरिषदेच्या मतदार यादीत गंभीर त्रुटी; मुख्याधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
- धाराशिव जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर
