वाशी( राहुल शेळके): कळंब तालुक्यातील पिंपळगाव (को)येथे दि.8 जून रोजी सायंकाळी आठ वाजता अचानक मुसळधार पाऊस चालू झाला. मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट सुरू होता. पिंपळगाव (को) येथील कल्याण अंबादास चौधरी यांचे मेन रोडवर कुंदन किराणा स्टोअर्स छोटेसे दुकान आहे. पाऊस सुरू झाला म्हणून चौधरी यांनी दुकानाला कुलूप लावून आपल्या घरी गेले. तोच सायंकाळी 8:32 मिनिटांनी विजांचा कडकडाट झाला. एक वीज किराणा दुकानाला धडकून दरवाज्यातून आत गेली. त्यामुळे तेथे मोठा आगीचा लोळ निर्माण झाला. किराणा दुकानात विक्रीसाठी ठेवलेले सर्व साहित्य तसेच चौधरी यांच्या मुलाचे गेल्या सहा महिन्यापूर्वी लग्न झाल्यामुळे त्यांच्या लग्नात आलेले सर्व संसार उपयोगी साहित्य, कपाट ,दिवाण ,गादी, भांडे सर्व या आगीत भस्म झाले. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.ही घटना झाल्याबरोबर गावचे सरपंच ज्ञानेश्वर सुंदर तांबडे आणि आजूबाजूच्या गावकऱ्यांनी तेथे जाऊन आग वीजवण्याचा प्रयत्न केला. परंतु तो प्रयत्न फसला. या झालेल्या घटनेमुळे चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून प्रशासनाने त्यांना लवकरात लवकर पंचनामा करून मदत द्यावी अशी मागणी होत आहे.
- धाराशिव-सोलापूर रेल्वे प्रकल्पाचा खर्च 900 कोटींवरून 3000 कोटींवर दिशा समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांची माहिती
- मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात वाढ, पायाभूत प्रकल्पांना गती
- धाराशिव जिल्ह्यात मराठा आंदोलन तीव्र: सकल मराठा समाजाची लवकरच जिल्हा बंदची हाक, मुंबईला जाणारा दूध-भाजीपाला बंद करण्याचा इशारा
- येडशी बसस्थानक वगळून जाणाऱ्या एसटी बसला चाप: ज्येष्ठ नागरिकाच्या तक्रारीनंतर चालक-वाहकावर कारवाई
- मराठा समाजाच्या कल्याणासाठी फडणवीस-शिंदेंचे सर्वाधिक योगदान : नरेंद्र पाटील