धाराशिव दि.३० (प्रतिनिधी) – येथील अभिनव इंग्लिश स्कूलमध्ये गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला आहे. २५ टक्के प्रवेश न देता शिक्षणाचा मूलभूत अधिकार कायदा २००९ चे उल्लंघन केले आहे. त्यामुळे संबंधित शाळेवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, धाराशिव येथील अभिनव इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षणाचा मूलभूत अधिकार कायद्यानुसार गरीब घटकांतील २५ टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश देणे बंधनकारक आहे. मात्र या स्कूलने या कायद्याचे उल्लंघन करून गरीब विद्यार्थ्यांना हक्काच्या शिक्षणापासून वंचित ठेवले आहे. विशेष म्हणजे आरटीई अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४ साठी संबंधित विद्यार्थ्यांनी शासकीय नियमानुसार अर्ज दाखल केले होते. मात्र या स्कूलने आरटीई नियमांचे सरळ सरळ उल्लंघन करून गरीब विद्यार्थ्यांना हक्काच्या शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे कारस्थान केले आहे. त्यामुळे २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. या निवेदनावर जलालोद्दीन शेख, प्रभाकर देशपांडे, समीर रजवी, नवनाथ गुरमे, आसिफ तांबोळी व राजू शेख यांच्या सह्या आहेत.
- सर्वपक्षीय विरोधकांना टक्कर देत आमदार तानाजी सावंतांनी गड राखला
- विद्यार्थ्यांच्या वर्दळीच्या रस्त्यावर अपघात; दोन ट्रॅक्टर पलटी, दुकाने व नागरिक थोडक्यात बचावले
- पेट्रोल पंपाला दंड,धाराशिव जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा महत्त्वपूर्ण निकाल
- विदेशी दारू तस्करीवर उत्पादन शुल्क विभागाची धडक; १४ लाखांचा मुद्देमाल जप्त
- भाजपची हुजरेगिरी करणे महागात पडले, खोटी माहिती पसरवल्याने अखेर तीन सोशल मिडिया पेजवर गुन्हा दाखल, महाराष्ट्रात खळबळ!
