विठ्ठलाच्या चेअरमन पदी भगिरथ दादा भालके यांची बिनविरोध निवड करा – शिवाजी हुंगे-पाटील

0
100

                  

 मगरवाडी-( विठ्ठल जाधव )            

पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कै.भारत नाना भालके यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्या रिक्त झालेल्या चेअरमन पदाकरिता विद्यमान आमदार तथा विठ्ठल सह साखर कारखान्याचे चेअरमन भारत नाना भालके यांचे चिरंजीव व विठ्ठल सह साखर कारखान्याचे संचालक भगिरथ दादा भालके यांची बिनविरोध संचालक मंडळानी निवड करावी असे मत विठ्ठल परिवाराचे नेते शिवाजी हुंगे-पाटील यांनी दैनिक जनमत ला बोलताना हि माहिती दिली. आ.भारत नाना भालके यांनी विठ्ठल सह साखर कारखाना लवकर चालू व्हावा व सभासद बांधवांची एफ आर पी लवकरच  देण्यासाठी शेवटच्या घटका प्रर्यत प्रयत्न केले. राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार साहेब ,महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी चे नेते जयंत पाटील  यांना काही ही करा पण माझ्या शेतकर्याचा राजवाडा चालू झाला पाहिजे म्हणून अनेक वेळा मंञालयामध्ये फेरया मारत असताना अचानक आ. भारत नाना भालके यांची तब्येत ढासळला लागली होती .परंतु कारखाना अडचणीतून बाहेर काढणे महत्वाचे होते .म्हणून भारत नानांनी स्वतःच्या तब्येतीची काळजी न घेता ते शेवटच्या क्षणापर्यंत कारखाना, सभासद ,कामगार यांचाच विचार करत होते .आणि नाना अचानक पुणे येथे रूबी हाॅस्पिटला अॅडमिट झाले आणि त्या ठिकाणी त्यांची प्राणज्योत मावळली  शेतकर्याच्या व कारखान्याच्या हिताचा निर्णय घेणार आमदार व चेअरमन भारत नाना भालके हे सर्वांना सोडून गेले आज विठ्ठल सह साखर कारखान्याचे चेअरमन पदाची निवड होते जर आ. भारत नाना भालके यांचे चिरंजीव व विठ्ठल सह साखर कारखान्याचे संचालक मा भगिरथ दादा भालके यांना संचालक मंडळानी  बिनविरोध चेअरमन केले तर खर्या अर्थानी भारत नानांना श्रद्धांजली अर्पण केले जाईल . भगिरथ दादा भालके हे भविष्यात चांगल्या प्रकारे कारखाना चालवून नावारूपाला आणतील त्यांत शंका नाही .आणि कारखान्याचा सिझन चालू आहे त्यामुळे सर्व संचालक मंडळानी कुठल्याही प्रकारची संकुचित भावना मनामध्ये  निर्माण होऊ न देता .त्यांच्याच संचालक मंडळातील सहकार्याला आशिर्वाद व सात देऊन भगिरथ भालके यांना चेअरमन करावे आणि विठ्ठल सह साखर कारखाना सोलापूर जिल्हात नाही तर महाराष्ट्रात पुन्हा नावारुपाला आणावा भारत नानांच्या निधनानंतर पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील जनतेचे मोठ्या प्रमाणात नुसकान झालेले आहे .आता विठ्ठल परिवारातील नेत्यांनी व  कार्यकर्तेनी एक मेकांच्या हातात हात घालून काम करणे गरजेचे आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here