भैरवनाथ साखर कारखान्याच्या विरोधात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा

0
127





गुलाल आम्हीच लावलाय मला बुकाही लावता येतो हे विसरू नका,शेतकऱ्यांशी बेईमानी करु नका महागात पडेल माजी आ. ज्ञानेश्वर पाटील यांचा इशारा 

परंडा – दि२७ ऑक्टोबर –  परंडा विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा जिल्हयाचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी बेईमानी न करता शेजारील आयाण बाणगंगा सहकारी साखर कारखाण्या प्रमाणे ऊसाला दर द्यावा अन्यथा गुलाल आम्हीच लावला आहे,आम्हाला बुकाही लावला येतो असा जोरदार हल्ला माजी आ.ज्ञानेश्वर पाटील यांनी मोर्चाचे सभेत रूपांतर झाले त्या वेळी उपस्थीत शेतकऱ्यांना संबोधीत करताना  केला.

      दि २७ ऑक्टोबर रोजी मंत्री सावंत यांच्या सोनारी येथील भैरवनाथ साखर कारखान्या विरूध्द मागील गळीत हंगामाचा ऊसदर प्रतिटन २४५० रुपये देण्याच्या मागणी साठी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या नेतृत्वाखाली उस उत्पादक शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चात परंडा भुम वाशी तालूक्यातील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते .

     या वेळी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी सावंत यांचा समाचार घेताना म्हणाले की मंत्री पदा साठी तानाजी सावंत यांनी गद्दारी केली आहे.ज्या शेतकऱ्यांनी तुम्हाला मोठे केले त्यांच्याशी गद्दारी खपवुन घेतली जानार नाही.चालू गळीत हंगामाचा दर भैरवनाथ साखर कारखाण्याने जाहिर करावा व मागील गळीत हंगामाचा प्रतिटन २४५० रुपयाचा  दर देण्यात यावा अन्यथा उस उत्पादक शेतकऱ्यांसह पुढील मोर्चा थेट सोनारी येथील भैरवनाथ साखर कारखाण्यावर काडणार असुन  कारखाना बंद पडल्यास स्वतः आपण जबाबदार राहाचल असा इशारा पाटील यांनी दिला आहे.

     परंडा विधानसभा मतदार संघातील मतदारांनी व ऊस उत्पादक शेतकरी यांनी शिवसेने उमेदवार म्हणूण तुम्हाला गुलाल लावला आहे.त्यांनी कष्टानी पिकवीलेल्या उसाला शेजारील करखाण्या प्रमाने उस बिल अदा करा त्यांच्याशी बेईमानी करू नका अन्यथा ज्यानी आपल्याला गुलाला लावला ते बुकाही लावतील असेही पाटील महणाले

      यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर,जिल्हा प्रमुख गौतम लटके तालूका प्रमुख मेघराज पाटील,चेतन बोराटे,शिवाजी ठवरे यांनी उपस्थीत शेतकऱ्यांना मागदर्श करताना भैरवनाथ साखर कारखाण्याने आयाण बाणगंगा सहकारी साखर कारखाण्या प्रमाने प्रतिटन २४५० रुपये दर द्या आशी मागणी केली.

      यावेळी उद्वव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे दिलीप शाळु,शहर प्रमुख इरफान शेख,मा.नगर अध्यक्ष शिवाजी मेहेर,जनार्धन मेहेर,सुभाष शिंदे, ज्ञानेश्वर गीते,चेतन बोरडे,संतोष गायगवाड,रेवण ढोरे,प्रशांत गायकवाड,ईस्माईल कुरेशी, मैनुद्दीन तुटके,शंकर ईतापे,अब्बास मुजावर, हनुमंत कातुरे, रईस मुजावर,रफीक मुजावर,सलीम मुजावर,शाहरुख मुजावर,सलीम मुजावर,शंकर जाधव, बप्पा चव्हाण,भाऊ सुर्यवंशी, बुद्धीवान गोडगे,बुद्वीवान लटके, अंकुश डांगे,प्रताप पाटील,दिपक गायकवाड,दिपक भापकर,मानीक शिदे,उमेश परदेशी,कुणाल जाधव, भालचंद्र पाटील,शिवाजी कासारे, सुरेश डाकवाले,दत्ता मेहेर,रंगणाथ देवकर,रामलीग गायकवाड,

याच्या सह शेतकरी मोठया संखेने उपस्थित होते.

      या वेळी खासदार ओमराजे निबांळकर,मा.आ.ज्ञानेश्वर पाटील, जिल्हाप्रमुख गौतम लटके, तालुकाप्रमुख मेघराज पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवारांच्या हस्ते उस दरवाढ मागणीचे निवेदण तहसिलदार रेणूकादास देवणीकर यांना देण्यात आले.

  ——————————————–

 ऊस दर मागणी मोर्चाची सुरुवात मा.आ. ज्ञानेश्वर पाटील यांच्या नेतृत्वाखाली खासापुरी चौक येथून  हा मोर्चा राजापूरा गल्ली,आगरकर गल्ली,मंडई पेठ,आठवाडी बाजार टिपू सुलतान चौक मार्गने छत्रपती चौकात पोहचताच मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.यावेळी उपस्थीत मान्य वारांनी शेतकऱ्यांना संबोधीत करताना भैरवनाथ साखर कारखाण्याकडे इतर साखर कारखाण्याप्रमाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसदर देण्याची मागणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here