तासगाव शहरातील व्यापारी असोसिएशनने व्यापारपेठ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच पर्यंत चालू ठेवण्याचा घेतला निर्णय

0
104

तासगाव प्रतिनिधी
सध्या जगासह भारत देशामध्ये कोरोणाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामध्ये महाराष्ट्रात सांगली जिल्हा मध्ये हे कोरणा बाधित रुग्ण संख्या एका आठवड्यापूर्वी फारच कमी होती. परंतु एक आठवड्यात सांगली जिल्ह्यामध्ये रुग्णांची संख्या तिप्पट झाली आहे. तर तासगाव शहरांमध्ये रुग्णांची संख्या एक महिन्यापूर्वी फक्त चार होती. परंतु एकाच आठवड्यात रुग्णाची संख्या पंचवीस च्या घरात गेली आहे परवा दिवशी आठ, काल पुन्हा सहा रुग्ण तर आज एक रुग्णाची भर पडलेली आहे. ज्यादा रुग्ण कोरोणा बाधित आढळल्याने तासगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे. तर नागरिकांच्या मध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. तासगाव शहरालगत वासुंबे येथे एक तर परवा दिवशी एक काल एक तर आज पुन्हा वासुंबे दत्त कॉलनी परिसरातील एक असे एकूण चार  कोरोणा बाधित रुग्ण दगावल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून तासगाव शहरातील व्यापारी असोसिएशनने आपली सर्व दुकाने आजपासून सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे. आतापर्यंत तासगाव शहर व तालुका मिळून कोरोणा बाधित रुग्णांची  संख्या ही शंभराकडे कडे जात असून लवकरच तो पूर्ण होईल असे सध्याचे तर वातावरण दिसत आहे तरी नागरिकांनी योग्य काळजी घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे. मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिंग व सॅनीटायजर चा वापर करणे, कामाशिवाय घराबाहेर न पडणे वयस्कर मंडळी व लहान मुलांनी घरी हमने जरुरीचे झाल्यास आहे. एकंदरीत तासगाव शहरांमध्ये सर्वांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वात महत्त्वाचे कोरोना रुग्णाचे रुग्णाचे निधन झाल्यानंतर सदरचे रुग्णाचे शव हे नातेवाईकांच्या कडे दिले जाते नाही. प्रशासनाच्या वतीने मयत रुग्णावर अंत्यसंस्कार केले जातात अशी प्रशासनाची भूमिका असते परंतु तासगाव मध्ये काल कोरोना बाधित मयत रुग्णाला तासगाव येथील स्मशानभूमीत दफन केल्याची माहिती प्राप्त झाली असल्याने तासगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे. या बाबतीत तासगाव नगरपालिकेने हात वर केले चे चित्र दिसत आहे. तासगाव नगरपालिकेच्या वतीने कायद्यानुसार दफन केल्याची माहिती दिली आहे. हे असे घडलेच कसे याबाबतीत तासगाव शहरातील नागरिकांच्या मध्ये उलट-सुलट चर्चा सुरू आहे. याबाबत प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची मागणी तासगावकर नागरिक करीत आहेत. सदर सर्व गोष्टीवर तासगावच्या तहसीलदार श्रीमती कल्पना ढवळे, मुख्याधिकारी श्री गणेश शिंदे, पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल सूर्यवंशी, डॉ. अनिल माळी, बि.डी.ओ. दीपा बापट इत्यादी लक्ष ठेवून आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here