शालेय पोषण आहारावर शाळेचा डल्ला, शासनाची फसवणूक केल्याची तक्रार

0
158

शाळेतील विद्यार्थ्यांच्या पटनोंदणी व उपस्थितीचे प्रमाण वाढविण्यासाठी आणि शाळेतील विद्यार्थ्यांची गळती थांबविण्याकरीता सुरू झालेल्या शालेय पोषण आहारावर शाळेनेच डल्ला मारला असून शासनाची फसवणूक केल्याची तक्रार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
महात्मा गांधी विद्यालय केसर जवळगा ता. उमरगा या शाळेत हा प्रकार घडला असून राजशेखर सिद्रामप्पा चिंचोरे यांनी याबाबत तक्रार केली आहे.
या प्रकरणात भ्रष्टाचार झालेला असल्याने आणि लहान मुलांच्या पोषण आहारावर डल्ला मारून स्वतःच्या स्वार्थासाठी, पैसे मिळवण्यासाठी, लाभासाठी, शासनाला -वरिष्ठांना खोटे अहवाल पाठवून, खोटे पटसंख्या दाखवून, बँकेतील स्टेटमेंट कोणतेही जुळत नसताना देखील त्याबाबतची बिले काढून, स्वतःच्या लाभासाठी संबंधित मुख्याध्यापक, संबंधित गटशिक्षणाधिकारी, संबंधित गटविकास अधिकारी आणि शालेय पोषण आहार व तद संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी संघटित रित्या गुन्हेगारी स्वरूपाचा कट आखून शासनाचे नुकसान केले आहे. त्याचप्रमाणे शासनाचे आर्थिक नुकसान केलेले आहे, तसेच लहान मुलांच्या मूलभूत हक्काचा शालेय पोषण आहार त्यांना दिला गेला नाही असे तक्रारीत म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here