उमरेगव्हाण येथे एसटी बसच्या फेऱ्या गावात सुरळीत न केल्यास लवकरच रास्ता रोको आंदोलन

0
73



राज्य परिवहन महामंडळाच्या धाराशिव (उस्मानाबाद)आगारातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे उमरेगव्हाण गावात एसटी बसेसच्या फेऱ्यांचे नियोजन कोलमडले असून बसच्या फेऱ्या गावात होत नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनला. विद्यार्थ्यांना बसची वाट पाहत गावापासून १.५ किलोमीटर वर जाऊन थांबावे लागते. त्यामुळे शाळकरी मुलींच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला.तसेच ज्येष्ठ नागरिक यांना चालत जाणे खूप दूर होत आहे ,गाव असून नसल्यासारखे भावना तयार झाली आहे.सिताई सामाजिक संस्था तर्फे ३_४ वेळा निवेदन देऊन देखील महामंडळ दखल घेत नसून त्यामुळे या भागातील बसेसच्या फेऱ्या गावात सुरळीत न केल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा  कै.सिताबाई लक्ष्मण बनसोडे बहुउददेशिय सेवाभावी सामाजिक संस्था उमरेगव्हाण तर्फे जिल्हाधिकारी तसेच एसटी महामंडळ कार्यालय यांना  देण्यात आला आहे.

शाळा व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी शहर तसेच इतर ग्रामीण भागात मूल मुली जातात. त्यासाठी त्यांना एसटी बस शिवाय दुसरा पर्याय नाही. एसटी बस न आल्यास या विद्यार्थ्यांना एक तर शाळा बुडवावी लागते किंवा जे खाजगी वाहन भेटेल त्या वाहनाने जावे लागते. यात मुलींच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here